राम मंदिराच्या प्रवेशाची तारीख, नोटांवर गणपती-लक्ष्मी यांचे छायाचित्र अशा गोष्टी सुरू झाल्या आहेत. या देशात ८० टक्के हिंदू राहतात. त्या हिंदूंचे रोजचे जगण्या-मरण्याचे प्रश्न वेगळे आहेत. महागाई- बेरोजगारीतून हिंदूंना मुक्ती नाही, सवलत नाही. अशा वेळी या देशाला धर्मवेडे बनवून मूळ प्रश्न आणि अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांसाठी हे नालायक राजकीय पक्ष देवी-देवतांचे फोटो-नाव यांचा आधार घेत आहेत. अरविंद केजरीवाल या षडयंत्रातील जुनेच कलाकार आहेत. वाचा रवींद्र आंबेकर यांचा लेख
घसरता रूपया.. घसरतं राजकारण https://www.maxmaharashtra.com/max-blog/will-rupee-raise-stronger-after-shri-ganesh-and-laxmi-photo-arvind-kejariwal-demand-stir-indian-politics-1176015
महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्
Comments