Skip to main content

Posts

Showing posts from September, 2016

मराठ्यांचा अणुबाँब

मराठ्यांचा अणुबाँब लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरतोय. या समाजात प्रचंड ताकद आहे. कधी लढवय्या, सधन-निर्धन शेतकरी असलेला हा समाज कालांतराने शासक आणि 'व्यवस्था' बनला. भिडायची सवय, टोकाची अस्मिता, जय शिवाजी म्हटलं की सळसळणारं रक्त, जातीचा प्रचंड अभिमान असा हा मराठा अर्थ-सत्ता आणि समाजकारणातील महत्वाचा घटक बनला. जागतिक अर्थव्यवस्था बदलत असताना काही लोकांनी कालानुरूप बदल केले, काहींना यागोष्टींची हवा लागली नाही. ज्यांना हवा लागली नाही ते आज रस्त्यावर आहेत. शेतजमीनीचे तुकडे पडले, बदलत्या निसर्गचक्रामुळे शेती बेभरवश्याची झाली. त्यामुळे शेती किंवा शेतीवर मजूरी करूनही चांगले पैसे मिळवणारा समाज हळूहळू गरीब होत गेला. मिश्यांचा पिळ कायम राहावा म्हणून कर्जबाजारी होत गेला. 'अख्खा गाव मामाचा, पण कोण नाही कुणाचा!' अशी स्थिती आज मराठा समाजाची झाली आहे. मराठा समाजाच्या गरिबीचं खोलात जाऊन असं बरंचंस विश्लेषण करता येऊ शकेल. कोपर्डीच्या निमित्ताने राग व्यक्त करण्यासाठी हा अस्वस्थ समाज बाहेर पडला आणि हळूहळू तुंबलेली सगळी अस्वस्थता बाहेर यायला लागली. मराठा अशी 'जात' च