Skip to main content

ऑनलाइन शाळा बंद करा

ऑनलाइन शाळा बंद करा 


कोरोना मुळे जगातील अनेक देशांचे व्यवहार ठप्प पडलेयत. सरकारची अधिवेशनं, बैठकाही होत नाहीयत अशा वेळी शाळा मात्र अट्टाहासाने सुरू ठेवल्या जात आहेत. शाळा सुरू ठेवण्यामागे शिक्षण सुरू ठेवणं ही भूमिका नाहीय, तर शाळेची फी सुरू राहिली पाहिजे अशी भूमिका दिसतेय. 

"ऑनलाइन शाळा या पालकांना लुटण्याचं साधन आहेत. केवळ फी घेण्यासाठी या शाळा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. पालकांकडून फी घेण्यावर बंदी घालण्यात यायला हवी, शाळांच्या स्टाफच्या पगारासाठी सरकारने अनुदान द्यायला हवं."
मी जितक्या लहान मुलांना ऑनलाइन शिक्षण घेताना पाहिलंय, त्यावरून ही मुलं काही रिसिव्ह करत आहेत असं दिसत नाही. अनेकदा तर मुलांना मी कानात हेडफोन लावून झोपलेलं पाहिलंय. सलग पाच - सहा तास ऑनलाइन शाळा भरवण्याचा अट्टाहास हा केवळ फी साठी आहे. यात शिक्षणाबाबतची आत्मीयता मला कुठेच दिसत नाही. शिक्षक ही या ऑनलाइन शिक्षणासाठी सरावलेले नसल्याने सदैव गोंधळलेलेच असतात. ऑनलाइन ट्रेनिंग साठी आवश्यक स्लाइड नसणे, इनोवेटीव पद्धतीचा अभाव, एकेका ऑनलाइन क्लास मध्ये असलेली दोन-तीन तुकड्यांची मुले, सलग भाषण यामुळे मुलांची आकलनशक्तीची पुरती वाट लागलेली आहे.
सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन शाळा या मुलांची वाढ खुंटवणाऱ्या आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आहेत. कोरोना हा संपूर्ण वर्षभर राहिल असं एकंदरीतच चित्र आहे, शाळा कधी सुरू होतील हे निश्चितपणे कोणाीच सांगू शकत नाहीय. त्यामुळे दरमहिन्याला लॉक-अनलॉकच्या फँसी टर्मॉलॉजी मध्ये देशाला अडकवून ठेवण्यात आलेलं आहे. या मुळे राजकीय पक्षांनी-सत्ताधारी पक्षांनी आपली मान सोडवून घेतलीय. कोणीच ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. 
एक साधासा विचार करायला काय हरकत आहे, की जर हे असंच चालणार असेल तर हे वर्षच शैक्षणिक आयुष्यातून डिलीट का करू नये. एक वर्ष भर विद्यार्थ्यांना इतर ऍक्टिव्हिटी का देण्यात येऊ नयेत.. काय होईल एक वर्षे शाळा बंद राहिल्या तर.. छोट्याश्या मोबाईलच्या स्क्रीन वर, खराब नेटवर्क, तुटक ऑडीयो यामुळे मुलं खरंच शिकतायत का.. साधारण घरामध्ये लॉकडाऊन मुले घरात असलेल्या लोकांची संख्या, त्यांचा आवाज, त्यांच्या घरात सुरू असलेल्या इतर ऍक्टिव्हिटी यामुळे मुलांचं अभ्यासात अजिबात लक्ष नसतं. आलिशान बेडरूम मध्ये दरवाजे बंद करून छान स्टडी टेबल वर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वर बसलेला विद्यार्थी ही या देशातल्या पॉलिसीमेकर-मिडीया-मध्यमवर्गाची कविकल्पना आहे. साधारण शहरी माणूस हा दाटीवाटीच्या घरात राहतो. त्याच्या घरात या शिक्षणासाठी आवश्यक वातावरण नाही. ग्रामीण भागात थोडी ऐसपैस जागा असली तरी एकतर गॅझेट किंवा नेटवर्क नाही अशी स्थिती आहे. 
सरकारने या परिस्थितीत तातडीने लक्ष घालून या ऑनलाइन शाळा नावाचा फ्रॉड तातडीने बंद केला पाहिजे. किंवा लॉकडाऊनच्या काळात विविध भागांमधली समाजमंदिरे या मुलांसाठी खुली करून दिली पाहिजे. जरा मोकळ्या वातावरणात या मुलांना शारिरीक अंतर बाळगून बसता येईल अशी व्यवस्था केली पाहिजे, आणि हे सर्व करणं मला वाटतं सरकारला शक्य होणार नाही. 
अशा परिस्थितीत या शाळा बंद करणे, शाळांनाही व्यवस्थापन चालवता यावं यासाठी सरकारने पॅकेज देणे असे निर्णय घेतले पाहिजेत. शाळांच्या पायाभूत सुविधा न वापरताही आज विद्यार्थी पूर्ण फी देत आहेत. शाळांच्या इमारती निर्माण करताना शाळांनी भरमसाठ विकास निधी विद्यार्थ्यांकडून घेतलेलाच असतो. त्यामुळे चार-पाच महिने शाळा बंद राहिल्या तर त्यांनी आपल्या राखीव निधीमधून इमारत दुरूस्तीचा खर्च चालवावा. स्टाफच्या पगाराचं अनुदान सरकारने द्यावं. हा भूर्दंड आता पालकांवर टाकू नये, आणि त्यासाठी विद्यार्थ्यांच्या शारिरीक, मानसिक आरोग्याशी खेळू नये.

- रवींद्र आंबेकर
संपादक,
मॅक्समहाराष्ट्र 

Comments

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्

ओवैसी आणि बरंच काही....

  owaisi brothers - messiha of Muslims?? " देशातले पोलीस पंधरा मिनिटांसाठी हटवा मग बघा.... " जाहीरपणे धमकी देणाऱ्या ओवैसीची आणखी एक व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे , ती म्हणजे महाशिवरात्रीला लोक उपवास करतात , जागरण करतात म्हणून दोन दिवसांची सुट्टी देण्याची मागणी करणारं अकबरूद्दीन ओवैसीचं भाषण. तर राज्यघटना , सुप्रीम कोर्टाच्या निर्णयचे दाखले , वेगवेगळ्या कमिट्यांचे दाखले देत विरोधकांना गप्प करणारे असदद्दुन ओवैसी .. ओवैसीची खरा चेहरा नेमका काय , काय आहे त्यांच्या मनात , काय आहे त्यांचा अजेंडा हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता होती. वांद्रे निवडणूकीच्या निमित्ताने असादुद्दीन ओवैसींना भेटण्याचा योग आला. मोठा ओवैसी म्हणजे अगदी भारदास्त- प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची विषयांची मांडणी अगदी सखोल. थोडक्यात विश्लेषण करायचं म्हणजे जुबान हम भी रखते हैं या एका वाक्यात असादुद्दीन आपलं धोरण आणि पुढच्या राजकारणाची दिशा सांगतात. ओवैसीना जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात खूप दिवसांपासून होती. गेले अनेक महिने मी त्यांच्या राजकीय प्रवास आणि निर्णयांचा बारकाईने अभ्यास करतोय. ओव

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. पहिल्