Skip to main content

Half Chaddhi

हाफ चड्डी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वत:चा गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला. खाकी अर्धी चड्डी ही संघाची ओळख बनली होती. कालानुरूप त्यात बदल केला ही स्वागतार्ह गोष्ट आहे. तरूणांना आकर्षित करण्यासाठी किंवा आपण काळासोबत आहोत हे दाखवण्यासाठी घेतलेला निर्णय आहे.
संघाने काळाची पावले उशीरा ओळखली. चड्डी बदलायला वेळ लागला. यावेळी देश आए आता दुरूस्त पण या असं आवाहन करण्याचा मोह अनेक पुरोगाम्यांना झाला. मला पण झाला पण मी तो आवरला. चड्डी हा केवळ संघाचा गणवेश नाही विचारधारेचं प्रतिक बनली होती. हा देश हाफ चड्डी वाल्यांच्या हातात देणार का ? असं एखादा नेतां भाषण करतो तेव्हा त्याचा अर्थ संघ असा असतो. त वरून ताकभात तसं चड्डी म्हटलं की संघी मानसिकता असं ओळखायचं. चड्डी वाल्यांच्या फुलपँटवाल्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसू शकता पण पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला हाफचड्डी टेस्ट पास करावी लागते. हाफचड्डी ला जो जास्त शिव्या देईल तो जास्त पुरोगामी... असं काहीसं समीकरण डोक्यात असल्याने मोठी स्पर्धा लागलेली दिसते मधल्या काळात.
दरम्यानच्या काळात संघ वाढला, संघाचा प्रभाव वाढत असताना संघाला विरोध करणाऱ्या शक्ति वयोवृद्ध होत असल्यासारख्या वाटल्या. संघाच्या विरोधातला आवाज फार मोठा आहे, तरी पण संघाच्या एकवटलेल्या ताकदीपुढे तो क्षीण वाटतो. 
चड्डी बदलली म्हणजे संघ बदलला किंवा बदलतोय असं मानायचं काहीच कारण नाही. गणवेशामुळे फार परिणाम होत असता तर खादीधारी आणि खाकी वर्दीधारींनी कधी भ्रष्टाचार केला नसता. आपल्याला नाविन्याचं वावडं नाही एवढंच दाखविण्याचा फार तर प्रयत्न म्हणावा. 
हाफचड्डी बदलल्याने संघाचे विचारधारा बदलणार आहे का? कुणी महिला सरसंघचालक बनेल का? सदैव पिछडी जातींचा भाषणात उल्लेख असलेली भाषणं संघाचे नेते करतात, त्यांच्या अधिकारांबाबत कृती करतील का ? ज्यांनी धर्मांतरण केलेले नाही असा मागास समाज हिंदूच आहे, त्यामुळे त्या समाजाला समान अधिकार देणार का? हिंदूराष्ट्राच्या कल्पनेतून संघ बाहेर येणार का? मध्येमध्ये उगवणाऱ्या लव्ह जिहाद सारख्या विषयांवरून एकूणच मुस्लीम समाजाच्या विरोधात विष कालवणं थांबवणार आहे का? संघ खुल्या दिल्याने राज्यघटना मान्य करणार आहे का? असे अनेक प्रश्न माझ्या मनांत येतात. 'चड्डी नहीं सोच बदलतो' असं सांगीतल्याने काही बदल होणार आहे का? बरं असा सल्ला कुणी कुणाला द्यायचा, असा सल्ला द्यायचा नैतिक अधिकार इतर राजकीय पक्षांवर उरलाय का? 
संघावर खूप आक्षेप आहेत. हिंदुत्वाच्या नावाने सतत हिंदूंना तलवारी परजत बसवायचे धंदे संघाने सोडले पाहिजेत. वाचाळ साधू- साध्वींच्या धर्मबुडव्या भाषणांवर अंकुश आणला पाहिजे. मी संघाला लाख सल्ले देऊ शकतो आणि माझं पुरोगामी असणे सर्टीफाईड करून घेऊ शकतो. पण माझे पुरोगामी चळवळींवर पण खूप आक्षेप आहेत. पुरोगामी असणाऱ्यांना सर्वच विषयांवर मतप्रदर्शाचं लायसन्स मिळालेलं असते. त्यामुळे आपला विचार खपत नाहीय याची चिंता करण्याएवजी दुसऱ्यांचा विचार कसा अविचार आहे हे सिद्ध करण्यातच सर्व वेळ आणि शक्ती वाया जाते. आपला विचार का वाढत नाहीय, आपल्या विचारांनी हाफचड्डी तर घातलेली नाहीय ना हे तपासलं पाहिजे. आपण ग्लोबल का होत नाही, जगभर आपले अनुयायी असावेत, मोठ्या संख्येंने त्यांनी समाजसुधारणा आणि राजकीय सुधारणांच्या कामात पोझीशन घ्यावी असं का पुरोगामी मंडळींना वाटत नाही? 
संख्येचं,नाविन्याचं वावडं तर या चळवळींना नाहीय ना? नविन तरूण का येत नाही, विविध गटांमधले तेच तेच समविचारी एकत्र येऊन किती काळापर्यंत आपली ताकद वाढलीय असं "आल इज वेल.. आल इज वेल" चा धोषा लावणार आहेत. पुरोगामी चळवळींमध्ये नवीन विचार, नवीन मांडणी का येत नाही....आली तर ती वाढत का नाही.
बदलत्या काळाबरोबर पुरोगाम्यांचं अर्थशास्त्र का बदललं नाही असे अनेक प्रश्न मला पडतात. संघाने चड्डी बदलली आता पुरोगाम्यांनी सुद्धा आपल्या डोक्यातून हाफचड्डी काढून टाकावी. 



रवींद्र आंबेकर 
@ravindraAmbekar



Comments

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्

ओवैसी आणि बरंच काही....

  owaisi brothers - messiha of Muslims?? " देशातले पोलीस पंधरा मिनिटांसाठी हटवा मग बघा.... " जाहीरपणे धमकी देणाऱ्या ओवैसीची आणखी एक व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे , ती म्हणजे महाशिवरात्रीला लोक उपवास करतात , जागरण करतात म्हणून दोन दिवसांची सुट्टी देण्याची मागणी करणारं अकबरूद्दीन ओवैसीचं भाषण. तर राज्यघटना , सुप्रीम कोर्टाच्या निर्णयचे दाखले , वेगवेगळ्या कमिट्यांचे दाखले देत विरोधकांना गप्प करणारे असदद्दुन ओवैसी .. ओवैसीची खरा चेहरा नेमका काय , काय आहे त्यांच्या मनात , काय आहे त्यांचा अजेंडा हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता होती. वांद्रे निवडणूकीच्या निमित्ताने असादुद्दीन ओवैसींना भेटण्याचा योग आला. मोठा ओवैसी म्हणजे अगदी भारदास्त- प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची विषयांची मांडणी अगदी सखोल. थोडक्यात विश्लेषण करायचं म्हणजे जुबान हम भी रखते हैं या एका वाक्यात असादुद्दीन आपलं धोरण आणि पुढच्या राजकारणाची दिशा सांगतात. ओवैसीना जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात खूप दिवसांपासून होती. गेले अनेक महिने मी त्यांच्या राजकीय प्रवास आणि निर्णयांचा बारकाईने अभ्यास करतोय. ओव

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. पहिल्