Skip to main content

संघठना-बिंगठना..

मित्रांनो,

सध्या तब्येत खराब आहे, तरी फार हलकं वाटतंय. सचिन परब ला मी सहज म्हटलं होतं की अनेक वर्षें मीं वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम केलं, पण एवढा ताण मला पुर्वी कधीच वाटला नव्हता. टीव्ही जर्नालिस्ट असोशिएशन चे सलग दोन वर्षे अध्यक्षपद मिरवल्यानंतरही आपण या पदावर नसल्याचे अजिबात दु:ख होत नाहीए।

झालंच तर सुटकेची भावना जास्त तीव्र आहे. संघटनेमध्ये कुठल्यातरी पदावर काम करण्याची माझी काही पहिली वेळ नव्हती, मात्र राजकारणाला तोंड देण्याची ही पहिली आणि कदाचित शेवटची वेळ होती। डोक्याची भजी झाली, लोकांना हँडल करताना..
          
           पत्रकारांवरील हल्ल्यांनी वर्ष गाजलं.. आमच्या विक्रोळी ऑफिसवर हल्ला झाला तेव्हा मीच गेलो पुढे मार खायला, अध्यक्ष-बिध्यक्ष असं काही मनात नव्हतं, पण वाटलं आपण जरा समजवून सांगू शकू त्यांना...उलटंच झालं..एक कानफडात बसली.. त्यांना थांबवायला गेलो तर दुसरी ही बसली.. आणि नंतर हल्लेखोरांनी वागळेंना घेरलं..मग काय झालं ते सर्वांनीच पाहीलं.. शिवसैनिकांनी पत्रकारांकडून एवढा मार..अगदी मरेस्तोवर मार कधीही खाल्ला नसेल.. कायद्याच्या भाषेतील सेल्फ डिफेन्स म्हणजे काय असतं ते जवळून पाहिलं..एरवी आपलं ठरलेलं असतं मार खायचं..
त्यानंतर हल्ल्यांची रांगच लागली.. हल्ल्यांमध्ये जातीपातीचं, धर्माचं, भाषेचं राजकारणही यायला लागलं..
तो मराठी होता म्हणून त्याचा आवाज लगेच उचलला गेला, तो मुस्लीम म्हणून त्याला मदत केली नाही, तो कॅमेरामन म्हणून रिपोर्टर्स पुढे आले नाहीत, तर कधी मार खाल्लेला पत्रकार छोट्या चॅनेलचा म्हणून तथाकथित मोठ्या चॅनेलच्या लोकांनी सपोर्ट केला नाही..हल्ल्यामधल्या या राजकारणाने डोकं भंजाळून गेलं होतं.. लवकरात लवकर पोहोचायचं म्हटलं तरी एवढ्या उशीरा कशाला तमाशा बघायला आला का असे काहीसे डायलॉग कानावर पडायचे.... कान किटले काही-बाही ऐकून..

ह्या आधी छात्रभारती आणि राष्ट्र सेवा दला मध्ये काम केलं, त्यावेळी ते काम एन्जॉय करता आलं..कधी ओझं वाटलं नाही..पत्रकारांच्या संघटनेचं अध्यक्ष बनण्याचं एक ओझं सतत खांद्यावर वाटायचं.. किती क्षुल्लक लोकांना महत्त्व द्यायला लागायचं.. पण कशासाठी..ते वोटर आहेत म्हणून.. छे.. वाटायचं ह्यांची जबाबदारी आपल्यावर आहे....

30 तारखेला मी संघटनेचा अध्यक्ष म्हणून शेवटची सर्वसाधारण सभा घेतली.. सर्व अपेक्षित होतं तसंच घडत होतं.. चार दोन टाळकी नीतिमत्ता, नियम आणि पारदर्शकता याच्यावर खल करत बसली..संपूर्ण संघटनेचा भार त्यांच्याच डोक्यावर होता..म्हणून हक्कांवर बोंबाबोंब करणाऱ्यांनी मतदानाचं कर्तव्य पार पाडलं नाही त्याचं जास्त वाईट वाटतं....

संघटनेच्या एकंदरीतच भवितव्यावर गंभीर असणाऱ्यांना संघटनेशी संबंध जोडून घ्यायलाही आवडत नाही हे त्यांच्याच ई-मेल वरून स्पष्ट झालं.... मेल जोडलाय...।

Your first mail has tarnished my image in public by implying I’m a member of the said organisation, not having paid the annual fee for FY 2010-11. Your act was more serious as you declared me as a representative from NxxV (i.e. My Employer) when Managing Editor along with Resident Editor of this company has publically disassociated with the said Organisation. Thus, an open debate on this issue is in public interest and a chance to clarify my stand time to time.



तसंच कालच्या एजीएम मध्ये संघटनेकडे येणाऱ्या पैशांच्या बाबत फारच चिंता व्यक्त केली गेली..इन्टेन्शन पासून काही-काही...बापरे.. किती वेळ असतो लोकांकडे..यातील एकाही सदस्यांनी संस्थेला 5 पैशाची मदत कुठून आणून दिली नाही..पण मुद्दे..इतके की काम करणाऱ्या माणसाला काम करणं मुष्कील होऊन जाईल...आणि म्हणूनच संघटनेच्या अधिकृत इमेल आईडी वरून झालेलं

एक महत्त्वाचं संभाषण इथे जोडतोय... हे वास्तविक टीव्हीजेए च्या दोन तत्कालिन पदाधिकाऱ्यांमधील संभाषण आहे.. गुप्त नसावं कारण संघटनेच्या अधिकृत ई-मेल आईडी चा वापर करून हे संभाषण झालेले आहे, म्हणून संघटनेचा त्यावर पूर्ण हक्क आहे.  हेच लोक कधी काळी संस्थेकडे येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी पायघड्या टाकण्याबाबत चर्चा करत होते.. त्यांना आता संस्थेकडे आलेली देणगी पटत नाहीए... पोटशूळ उठलाय..... बरं ह्या सगळ्या गोष्ठींमागे त्या वेळी ही एकच विचार होता निवडणूकांचा....काही लोक केवळ निवडणूकांचांच विचार करतात..हे मी नाही बोलत..खाली दिलेले चॅट चे रेकॉर्ड वाचा..सगळं काही आपोआप समझेल..



-------------------------------------------------------------------------------------------------------------


From: Kaxxxsh Suxxr

Date: 2009/1/10

Subject: Chat with Kamxxsh Suxxr

To: tvjaonline@gmail.com


6:21 PM kamxxshsuxxr: katxe

raipur mayor cha kay / 


me: ha mayor kunachya tari madhyamatoon paise detoy mhane

6:22 PM kamxxshsuxxr: theek ahe...

me: yenarya laxmi la kadhi nahi mhanoo naye


kamxxshsuxxr: exactly


6:23 PM we shd aim at a corpus of 10 CR

me: aamen

kamxxshsuxxr: amen

inshallah

shd I mail u

6:24 PM that attachment

me: aapan tya denagicha cheque ghenaar aani tyaala pavati pan denaar aahot

kamxxshsuxxr: ho ho

me: MHADA attachment pathava asap

kamxxshsuxxr: bilkul

aapn 80 G certificate pan ghyava

ok

6:25 PM u'll get that in 5 mins

me: certificate kase ghyayache te sanga

nakki prayatn karu

6:26 PM shirke yani he karayala sangitale hotech

kamxxshsuxxr: apply with the charity commissioner

me: k

6:27 PM kamxxshsuxxr - pudhcha barsha nivadnukanche ahe


varsha* 



--------------------------------------------------------------------------------------------------------
आणखी काय बोलू.. सर्व समझलं असेलच.. गेले वर्षभर पदाच्या जबाबदारीमुळे काही गोष्टी बोलायची इच्छा असूनही बोलू शकलो नव्हतो.... आता मोकळा आहे..कुठल्याही संघटना - बिंगटनेचे टेन्शन नाही.... बरंच काही आहे बोलायचं... कदाचित बोलणार ही नाही...पण एक मात्र शिकलो...
मी माझ्या शत्रूंचा फार विचार करत बसलो..विलास आठवले मला सांगून थकला..सोडून दे म्हणून विचार करण... पण मला नाही जमलं..दुर्लक्ष करायला...

पण ह्या घटामोडीत जे लोक माझे होते..जवळचे होते... त्यांच्या कडे दुर्लक्ष झालं... पण ते सोबत राहिले.. शेवटपर्यंत...आणखी काय हवं....

Comments

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्

ओवैसी आणि बरंच काही....

  owaisi brothers - messiha of Muslims?? " देशातले पोलीस पंधरा मिनिटांसाठी हटवा मग बघा.... " जाहीरपणे धमकी देणाऱ्या ओवैसीची आणखी एक व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे , ती म्हणजे महाशिवरात्रीला लोक उपवास करतात , जागरण करतात म्हणून दोन दिवसांची सुट्टी देण्याची मागणी करणारं अकबरूद्दीन ओवैसीचं भाषण. तर राज्यघटना , सुप्रीम कोर्टाच्या निर्णयचे दाखले , वेगवेगळ्या कमिट्यांचे दाखले देत विरोधकांना गप्प करणारे असदद्दुन ओवैसी .. ओवैसीची खरा चेहरा नेमका काय , काय आहे त्यांच्या मनात , काय आहे त्यांचा अजेंडा हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता होती. वांद्रे निवडणूकीच्या निमित्ताने असादुद्दीन ओवैसींना भेटण्याचा योग आला. मोठा ओवैसी म्हणजे अगदी भारदास्त- प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची विषयांची मांडणी अगदी सखोल. थोडक्यात विश्लेषण करायचं म्हणजे जुबान हम भी रखते हैं या एका वाक्यात असादुद्दीन आपलं धोरण आणि पुढच्या राजकारणाची दिशा सांगतात. ओवैसीना जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात खूप दिवसांपासून होती. गेले अनेक महिने मी त्यांच्या राजकीय प्रवास आणि निर्णयांचा बारकाईने अभ्यास करतोय. ओव

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. पहिल्