Skip to main content

Posts

तृप्ती ताई आता थांबा...

मंदिर प्रवेशासाठीचं आंदोलन जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यात प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष सहभाग मला घेता आला, तशी संधी मला मिळाली. मंदिरांमध्ये महिलांना प्रवेशाच्या आंदोलनातील एक महत्वाचा मुद्दा विसरला जातोय, तो म्हणजे हे केवळ मंदिर प्रवेशाचे आंदोलन नाही, तर हे समानतेसाठीचं आंदोलन आहे. महिलांना समान अधिकार, वागणूक मिळावी म्हणून हे आंदोलन आहे. यात मंदिर प्रवेश हा एक सविनय कायदेभंग सारखंच हत्यार आहे. त्याला हवं तर सविनय रूढी- परंपरा भंग म्हणू. याचाच अर्थ आम्हाला कायदे नकोत असा नाही, आम्हाला कालबाह्य कायदे, रूढी परंपरा नकोत. असमानता शिकवणाऱ्या परंपरा तर अजिबात नकोत. मंदिरातला देव जर महिला, दलित यांच्या सहवासात बाटत असेल तर तो देव टाकला पाहिजे असं माझं मत आहे. तृप्ती देसाईंच्या आंदोलनाचं हसं करण्याचा प्रयत्न आजूबाजूला होत असल्याचं दिसतंय. यात गैर आणि चुकीचं काहीच नाही असं मानणारा मोठा वर्ग आहे. त्या वर्गाचं बौद्धीक घ्यावं असं मला वाटत नाही. त्यांना त्यांची चूक पुढे लक्षात येईल. या आंदोलनाला विनोदाचा, वैयक्तिक टीकेचा, आरोप- प्रत्यारोपाचा विषय करणारे हे त्यांच्या वंशपरंपरेला साजेसे वागत आह...

Half Chaddhi

हाफ चड्डी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वत:चा गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला. खाकी अर्धी चड्डी ही संघाची ओळख बनली होती. कालानुरूप त्यात बदल केला ही स्वागतार्ह गोष्ट आहे. तरूणांना आकर्षित करण्यासाठी किंवा आपण काळासोबत आहोत हे दाखवण्यासाठी घेतलेला निर्णय आहे. संघाने काळाची पावले उशीरा ओळखली. चड्डी बदलायला वेळ लागला. यावेळी देश आए आता दुरूस्त पण या असं आवाहन करण्याचा मोह अनेक पुरोगाम्यांना झाला. मला पण झाला पण मी तो आवरला. चड्डी हा केवळ संघाचा गणवेश नाही विचारधारेचं प्रतिक बनली होती. हा देश हाफ चड्डी वाल्यांच्या हातात देणार का ? असं एखादा नेतां भाषण करतो तेव्हा त्याचा अर्थ संघ असा असतो. त वरून ताकभात तसं चड्डी म्हटलं की संघी मानसिकता असं ओळखायचं. चड्डी वाल्यांच्या फुलपँटवाल्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसू शकता पण पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला हाफचड्डी टेस्ट पास करावी लागते. हाफचड्डी ला जो जास्त शिव्या देईल तो जास्त पुरोगामी... असं काहीसं समीकरण डोक्यात असल्याने मोठी स्पर्धा लागलेली दिसते मधल्या काळात. दरम्यानच्या काळात संघ वाढला, संघाचा प्रभाव वाढत असताना संघाला विरोध ...

My Viwes on Journalist Associations

अत्याचार, भ्रष्टाचार, समाज में चल रही कुरितीयों के खिलाफ आवाज उठानेवाले पत्रकारोंको संगठन की जरूरत क्यों पडती है? इस सवाल का साधा जवाब देवता माझे कभी संभव नहीं हुआ। पत्रकार के हातों में इतनी ताकत है की वर हर किसी की समस्यांओं का समाधान कर सकती है, फिर ऐसी क्या जरूरत आन पडती है की संगठन बनाया जाय? बदलतें हालातों में पत्रकारिता की दिशा और दशा भी बदली है. स्वतंत्रता के पूर्व और उसके बाद वाले पत्रकारिता और अब के जमाने की पत्रकारिता में गुणात्मक फर्क है। तब पत्रकारिता विचारों के लिए होती थी,अब विचारों के साथ खबरों के लिए भी होती है। तब दुश्मन एक था अब कई सारे है और वो भी हर वक्त बदलते रहतें है। कुछ लोग कहते है कि पत्रकारिता का स्तर फिसल गया है, इसलिए पत्रकार टार्गेट किए जाते है। मैं इस बात ये सहमत नहीं हूॅं। समाज में अच्छे बुरे लोग-संस्था-शक्ती हर क्षेत्र में होती है, पत्रकारिता में भी ऐसी बुरी शक्तीयाॅं आ चुकी है। लेकीन इसका मतलब कतई ऐसा नहीं है कि पत्रकारिता का असली धर्म बदल चुका है। पत्रकारिता में आई हुई बुरी शक्तीयों से भी हमें लडना होगा। साथ ही हमें पत्रकारिता के विकास और उत्कर्ष के ...

क्या भगवान को नकारने का वक्त आ गया है?

शनी का प्रकोप होने के डर से गाँव वालों ने शनी शिंगणापूर के पत्थर को जिसे शनी माना जाता है,  उसे दूध से नहला दिया। एक महिला ने अनजाने में शनी के चबुतरे पर चढकर शनी के पत्थर को हाथ लगाकर शनीकी पूजा की, नमन किया  और लौट आई।महिला के शनी पूजन से शनी कितना रूष्ट हुआ पता नहीं पर गाँव वाले जरूर तिरमीरा उठे। न जाने अब इस वजह से कौन सा संकट आएगा। पिछले कई सालोंसे महाराष्ट्र के  अहमदनगर जिलें में स्थित शनी शिंगणापुर  नाम का गाँव पुरे देश में मशहूर है। शनी के कोप से बने के लिए या फिर शनी से पीछा छुडवाने के लिए लाखों भक्त यहाँ आते रहते है। शनी के पत्थर पर करोंडों का तेल चढता है। शनी की शांती करने के लिए न जाने क्या क्या करते है लोग।कई अघोरी बाबांओं को भी इसी शनी ने जन्म दिया है। पता नहीं ऐसा करने से कितने लोगोंके दु:ख खत्म हुए, लेकीन एक बात है की इन प्रथा-परंपराओंने कई समस्याओं को जन्मदिया है। शनी शिंगणापुर में शनी के चबुतरे पर महिलाओं के प्रवेश पर पाबंदी है। शनी के बाल ब्रम्हचारी होने की वजह से ऐसा नियम वहाँ पर लागू है। कई सालोंसे से महाराष्ट्र जैसे राज्य में चल रहीं इस प...

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. प...

You cant Kill Thoughts..!

ठो ठो वाल्यांचा पराभव दाभोलकर- पानसरेंच्या हत्येनंतरही हिंदुत्ववाद्यांसमोरील आव्हानं संपलेली नाहीत. या दोघांच्या खुन्यांपर्यंत पोलिस पोहोचलेले नाहीत , नजीकच्या काळात पोहोचू शकतील अशी शक्यताही कमीच आहे. मधल्या काळातल्या सत्तांतराबरोबरच अच्छे दिन येतील असं वाटणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना दररोज कुणी ना कुणी टक्कर द्यायला उभा ठाकतोय. कालपरवा विचारवंत डॉक्टर एम एम कलबुर्गीना पण गोळ्या घातल्या. त्यांचा ही विचार समाजाला घातक होता म्हणे. गोळ्या खूप आहेत आणि टार्गेट ही... त्यामुळे हे कधी थांबणार , मारेकरी कधी पकडले जाणार वगैरे प्रश्न आता मला पडत नाहीत. बाकीच्यांची का पडतायत हे ही एक कोडंच आहे. खरं तर टार्गेट न संपणे हा एक प्रकारे दाभोलकर- पानसरे- कलबुर्गींच्या विचारांचा विजयच आहे. गांधी मारल्यानंतर पण टार्गेट संपले नाहीत हा पण गांधीचा विजयच आहे... तसं अगदी. विवेकवादी नेत्यांना अशा पद्धतीने मृत्यू येणं हे सभ्य समाजाला साजेसं नाही. सत्ता कुणाचीही असो. असे प्रकार घडत असतात. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकालात दाभोलकरांचा खून होतो आणि भारतीय जनता पक्षाच्या कालखंडात पानसरेंना संपवलं जा...

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्...