Skip to main content

Posts

Open letter to Sharad Pawar

मा. शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. पत्र लिहिण्यास कारण की तुमच्या सध्याच्या राजकारणावरून मला काही प्रश्न पडलेयत. नेहमीप्रमाणे साहेबांना सर्व माहित असतं असं तुमच्या भक्तांकडून कळलं आणि विचार केला की थेट तुम्हालाच हे प्रश्न विचारावेत. तुम्ही सतत बेरजेचे राजकारण करत आलात, त्यामुळे तुमच्या राजकारणाचा आवाका कुणालाच लक्षात आला नाही. बेरीज करता करता तुम्ही इतके पुढे गेलात की नेमकं तुम्ही काय काय जोडलंय हे ही तुमच्या लक्षात राहिले नसावं. अर्थात यालाही तुमचे भक्त आक्षेप घेतील. साहेबांना सर्व माहित असतं, आणि त्यांच्या लक्षात सर्व असतं अशी त्यांची पक्की धारणा आहे. असो, तो काही आपला विषय नाही. गेली अनेक वर्षे तुम्ही राज्यातील पुरोगामी राजकारणाचा चेहरा आहात. संघ परिवारावर थेट, आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुरोगामी चळवळीतले लाखों कार्यकर्ते, कुठेच काही नाही झालं तर आहेत पवार साहेब, म्हणत थेट तुमच्या दारात यायचे. तुम्ही ही मोठ्या मनाने त्यांना सामील करून घेतलं. तुमचा पक्ष वाढत गेला. मग हळूहळू हा पक्ष नसून टोळी आहे असा आरोप विरोधी पक्षांनी सुरू केला. तुमच्यावरचा हल्ला म्हणजे पुर...

मराठ्यांचा अणुबाँब

मराठ्यांचा अणुबाँब लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरतोय. या समाजात प्रचंड ताकद आहे. कधी लढवय्या, सधन-निर्धन शेतकरी असलेला हा समाज कालांतराने शासक आणि 'व्यवस्था' बनला. भिडायची सवय, टोकाची अस्मिता, जय शिवाजी म्हटलं की सळसळणारं रक्त, जातीचा प्रचंड अभिमान असा हा मराठा अर्थ-सत्ता आणि समाजकारणातील महत्वाचा घटक बनला. जागतिक अर्थव्यवस्था बदलत असताना काही लोकांनी कालानुरूप बदल केले, काहींना यागोष्टींची हवा लागली नाही. ज्यांना हवा लागली नाही ते आज रस्त्यावर आहेत. शेतजमीनीचे तुकडे पडले, बदलत्या निसर्गचक्रामुळे शेती बेभरवश्याची झाली. त्यामुळे शेती किंवा शेतीवर मजूरी करूनही चांगले पैसे मिळवणारा समाज हळूहळू गरीब होत गेला. मिश्यांचा पिळ कायम राहावा म्हणून कर्जबाजारी होत गेला. 'अख्खा गाव मामाचा, पण कोण नाही कुणाचा!' अशी स्थिती आज मराठा समाजाची झाली आहे. मराठा समाजाच्या गरिबीचं खोलात जाऊन असं बरंचंस विश्लेषण करता येऊ शकेल. कोपर्डीच्या निमित्ताने राग व्यक्त करण्यासाठी हा अस्वस्थ समाज बाहेर पडला आणि हळूहळू तुंबलेली सगळी अस्वस्थता बाहेर यायला लागली. मराठा अशी 'जात' च...

Desh Ke Liye.....

देश के लिए....! वर्धा के पुलगाव स्थित सेनादल के डिपो में रात को भीषण आग लगी। वैसे मैं अभी किसी मीडिया के लिए काम नहीं कर रहा, मैं वर्धा कें सेवाग्राम में बापू के विचारो की ताकत को महसूस कर रहा था।लेकिन पता नहीं क्यों मेरा मन बेचैन सा था। वर्धा से आनंदवन की तरफ़ निकलना था, लेकिन फिर निर्धारित कार्यक्रम में बदलाव किया, शायद मेरे अंदर का रिपोर्टर मुझे आनंदवन की तरफ़ बढनेकी इजाज़त नहीं दे रहा था। मेरी टीम से साथ हम पुलगांव पहुँचे, वहाँ सेना के अॅम्युनेशन भांडार डिपो को रात को आग लगी थी! १७ के क़रीब जवान इस आग में झुलस कर मर गए, आग लगने के बाद जो धमाके हुए थे उससे अग़ल बग़ल के गाँव दहल उठे थे। लोग घबरा कर अपने गाँव छोड़कर भाग खड़े हुए। कुछ के मकानों को क्षति पहुँची थी। रास्ते में पुलिस वाले जगह जगह चौपाल लगाए बैठे थे। माहौल में कुछ तनाव महसूस हो रहा था, डिपो के पीछे कुछ गाँव थे,उसमें से एक गाँव में हम पहुँचे तो पुरा गाँव पंचायत की दफ़्तर में बैठा हुआ नज़र आया। बातचीत शुरू की तो पता चला की पुलिसवालों ने गाँव ख़ाली कराने का जो दावा किया था उसपर वो नाराज़ है। गाँववालों ने ख़ुद अपने घर छोड...

या महाराष्ट्राला आग लावा...!

या महाराष्ट्राला आग लावा...!  जय महाराष्ट्र, दगडांच्या देशा कणखर देशा... बघतोयस काय रागानं महाराष्ट्र मिळवलाय वाघानं अशा विविध संदेशांनी आपली छाती फुगत चालली आहे असं वाटत असेल तर आपल्याच कानाखाली दोन चार चापटी मारून भानावर या. अशाच तुताऱ्यांनी या महाराष्ट्राचं मोठं नुकसान केलंय. या तुताऱ्यांच्या आवाजाखाली अनेक आवाज दबले गेले आहेत. ते ऐकले तर आपण ज्याला अभिमानास्पद बोलतो तो अभिमान किती पोकळ आहे हे ही लक्षात येईल. एखाद्या चांगल्या दिवशी काही तरी वाईट बोलायची खोड असते काही लोकांना, तशी ती मलाही आहे. त्यामुळेच आजच्या चांगल्या दिवशी वाईट बोलायचं ठरवलंय. सामान्यतः आपण ज्या भूप्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा अभिमान आपल्याला असतो. हा अभिमान कधी कधी त्या भूप्रदेशाच्या विकासाला दिशा देतो किंवा मग त्या प्रदेशातील अनेक गैरव्यवस्थांवर पांघरून घालायचं काम करतो. एकदा का हा अभिमान आपण स्वीकारला की मग अनेक गोष्टींची चर्चा करायची नाही आणि पुढे जायचं असं गृहीत धरलेले असते. सामान्य माणूस सामान्यतः आपला फायदा काय होणार आहे याचा व्यापक किंवा सूक्ष्म हिशोब लाऊन आपापल्या कुवतीप्रमाणे आपला प्रकार निवडत ...

तृप्ती ताई आता थांबा...

मंदिर प्रवेशासाठीचं आंदोलन जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यात प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष सहभाग मला घेता आला, तशी संधी मला मिळाली. मंदिरांमध्ये महिलांना प्रवेशाच्या आंदोलनातील एक महत्वाचा मुद्दा विसरला जातोय, तो म्हणजे हे केवळ मंदिर प्रवेशाचे आंदोलन नाही, तर हे समानतेसाठीचं आंदोलन आहे. महिलांना समान अधिकार, वागणूक मिळावी म्हणून हे आंदोलन आहे. यात मंदिर प्रवेश हा एक सविनय कायदेभंग सारखंच हत्यार आहे. त्याला हवं तर सविनय रूढी- परंपरा भंग म्हणू. याचाच अर्थ आम्हाला कायदे नकोत असा नाही, आम्हाला कालबाह्य कायदे, रूढी परंपरा नकोत. असमानता शिकवणाऱ्या परंपरा तर अजिबात नकोत. मंदिरातला देव जर महिला, दलित यांच्या सहवासात बाटत असेल तर तो देव टाकला पाहिजे असं माझं मत आहे. तृप्ती देसाईंच्या आंदोलनाचं हसं करण्याचा प्रयत्न आजूबाजूला होत असल्याचं दिसतंय. यात गैर आणि चुकीचं काहीच नाही असं मानणारा मोठा वर्ग आहे. त्या वर्गाचं बौद्धीक घ्यावं असं मला वाटत नाही. त्यांना त्यांची चूक पुढे लक्षात येईल. या आंदोलनाला विनोदाचा, वैयक्तिक टीकेचा, आरोप- प्रत्यारोपाचा विषय करणारे हे त्यांच्या वंशपरंपरेला साजेसे वागत आह...

Half Chaddhi

हाफ चड्डी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वत:चा गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला. खाकी अर्धी चड्डी ही संघाची ओळख बनली होती. कालानुरूप त्यात बदल केला ही स्वागतार्ह गोष्ट आहे. तरूणांना आकर्षित करण्यासाठी किंवा आपण काळासोबत आहोत हे दाखवण्यासाठी घेतलेला निर्णय आहे. संघाने काळाची पावले उशीरा ओळखली. चड्डी बदलायला वेळ लागला. यावेळी देश आए आता दुरूस्त पण या असं आवाहन करण्याचा मोह अनेक पुरोगाम्यांना झाला. मला पण झाला पण मी तो आवरला. चड्डी हा केवळ संघाचा गणवेश नाही विचारधारेचं प्रतिक बनली होती. हा देश हाफ चड्डी वाल्यांच्या हातात देणार का ? असं एखादा नेतां भाषण करतो तेव्हा त्याचा अर्थ संघ असा असतो. त वरून ताकभात तसं चड्डी म्हटलं की संघी मानसिकता असं ओळखायचं. चड्डी वाल्यांच्या फुलपँटवाल्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसू शकता पण पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला हाफचड्डी टेस्ट पास करावी लागते. हाफचड्डी ला जो जास्त शिव्या देईल तो जास्त पुरोगामी... असं काहीसं समीकरण डोक्यात असल्याने मोठी स्पर्धा लागलेली दिसते मधल्या काळात. दरम्यानच्या काळात संघ वाढला, संघाचा प्रभाव वाढत असताना संघाला विरोध ...

My Viwes on Journalist Associations

अत्याचार, भ्रष्टाचार, समाज में चल रही कुरितीयों के खिलाफ आवाज उठानेवाले पत्रकारोंको संगठन की जरूरत क्यों पडती है? इस सवाल का साधा जवाब देवता माझे कभी संभव नहीं हुआ। पत्रकार के हातों में इतनी ताकत है की वर हर किसी की समस्यांओं का समाधान कर सकती है, फिर ऐसी क्या जरूरत आन पडती है की संगठन बनाया जाय? बदलतें हालातों में पत्रकारिता की दिशा और दशा भी बदली है. स्वतंत्रता के पूर्व और उसके बाद वाले पत्रकारिता और अब के जमाने की पत्रकारिता में गुणात्मक फर्क है। तब पत्रकारिता विचारों के लिए होती थी,अब विचारों के साथ खबरों के लिए भी होती है। तब दुश्मन एक था अब कई सारे है और वो भी हर वक्त बदलते रहतें है। कुछ लोग कहते है कि पत्रकारिता का स्तर फिसल गया है, इसलिए पत्रकार टार्गेट किए जाते है। मैं इस बात ये सहमत नहीं हूॅं। समाज में अच्छे बुरे लोग-संस्था-शक्ती हर क्षेत्र में होती है, पत्रकारिता में भी ऐसी बुरी शक्तीयाॅं आ चुकी है। लेकीन इसका मतलब कतई ऐसा नहीं है कि पत्रकारिता का असली धर्म बदल चुका है। पत्रकारिता में आई हुई बुरी शक्तीयों से भी हमें लडना होगा। साथ ही हमें पत्रकारिता के विकास और उत्कर्ष के ...