Skip to main content

Imported post: Facebook Post: 2022-06-26T10:56:41

ठाकरे सरकारचा प्रवास बरखास्तीकडे? रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण Maharashtra Political Update राज्यात निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचे विविधांगी सखोल विश्लेषण आवश्यक असते. मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी गेल्या आठवडाभरात केलेल्या विश्लेषणाचे विशेष बुलेटिन बंडाळी नंतर जरी महाविकास आघाडीचं सरकार तरलं तरी हे सरकार पुढील कार्यकाळ कसा पुरा करेल हा प्रश्न निर्माण झाला आहे. कमजोर शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पुढे सातत्याने झुकावं लागणार आहे. सरकार चालवायचं आहे तर काय असतील तीन शक्यता याचं विश्लेषण केले आहे मॅक्समहाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांनी. https://youtu.be/Lmc0fSdSYrE आदित्य ठाकरे यांची धमकी, पहा थेट चर्चा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर यांच्यासोबत... | #MaxMaharashtra https://www.maxmaharashtra.com/bs-video/aditya-thackeray-threat-to-eknath-shinde-group-1146978 महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आणि शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपने ऑपरेशन लोटस कसे राबवले, याचे विश्लेषण केले आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी... https://youtu.be/O1gh09fzp3A हिंदुत्वावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजरवर जोरदार हल्ले केले आहेत. पण आता त्याच भाजपच्या हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे यांनी बंड करत उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. एवढेच नाही तर याच मुद्द्यामुळे आज शिवसेना पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे, भाजपच्या या रणनीतीचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी... https://youtu.be/8kRWpWbhehQ शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीमागे त्यांना निधी न मिळाल्याचे काऱण सांगितले जाते आहे. याबाबत अनेक आमदारांनी याआधी वेळोवेळी आपली नाराजी अर्थखात्यावर व्यक्त केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आव्हान निर्माण होण्यास अजित पवार जबाबदार आहेत का, याचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी... https://youtu.be/Fp9-T8gX7f8 उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत जाण्याची तयारी असल्याचे एकनाथ शिंदे यांना सांगितले होते, असे वृत्त मॅक्स महाराष्ट्रने दिले आणि दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यास शिवसेना तयार असल्याची घोषणा केली. त्यामुळे मॅक्स महाराष्ट्रने दिलेल्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. पण महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडली तरी भाजप शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची शक्यता कमी आहे, याचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांनी... https://youtu.be/DhTJ1JO49zE हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या पक्षाच्या नेत्याचा मतदानाचा हक्क गोठवण्यात आला त्या पक्षाला आता हिंदुत्वाची अग्निपरीक्षा द्यावी लागत आहे. स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावून ज्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मोदींना जीवनदान मिळावं म्हणून ज्या पक्षाने आक्रमक भूमिका घेतली त्याच पक्षाला आता मोदींची भाजपा संपवू पाहतेय. हिंदुत्वाची ही नवी कार्यशाळा नक्की आहे तरी काय? मॉल समोर टपरी लावायला बंदी घालण्यासारखा हा प्रकार आहे का? हिंदुत्वाच्या दावेदारांची ही झोंबाझोंबी नक्की काय आहे? रवींद्र आंबेकर यांचे मातोश्री बाहेरून विश्लेषण https://youtu.be/j2rUW0OtHtA राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून भाषण केले. या भाषणाचा नेमका अर्थ काय आहे, याचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी... https://youtu.be/06zXdXC5e00 ठाकरे सरकारचा प्रवास बरखास्तीकडे? रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण https://youtu.be/wRdbWD6Q07k

Comments

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्...

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. प...

39 एके 39....39 दुणे...

मध्यंतरी नागपूर ला गेलो होतो हिंवाळी अधिवेशनाच्या कव्हरेज साठी.. अधिवेशनाचं रटाळ आणि एकसुरी कामकाज संपवल्यानंतर शनिवार - रविवार काय करायचं असा प्रश्न नेहमीच पडतो.. खाणावळी शोधून तरी किती शोधणार.. नागपूरातले जवळपास सगळी हॉटेल्स आतापर्यंत जीभेखालून गेलीयत, त्यामुळे शनिवार - रविवार नागपूराच्या बाहेर जायचा प्लान करत होतो.. मंत्री नितिन राऊतांशी बोलताना समजलं की वाशिम मध्ये काही युवकांनी एक चांगला प्रोजेक्ट केलाय, पाहण्यासारखा आहे. पूर्णत: कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेलं पण आता पंतप्रधानांचं पॅकेजच काय पण कुठलीही सरकारी कर्ज घेणार नाहीत म्हणणारं विदर्भातलं पहिलं गाव माझ्या निदर्शनास आलं.. इंटरेस्टींग वाटलं, म्हटलं जाऊन येऊयात, पण आता अशी पॉझीटीव्ह स्टोरी लागेल की नाही याची शाश्वती नव्हती. शेवटी दिल्ली शी बोललो.. एरव्ही मला आतापर्यंत मला नोकरी देणाऱ्या कुठल्याही चॅनेलने फिरू नको असं कधीच सांगीतलं नाही, आताही तसाच अनुभव आला... दिल्ली हून ओके मिळाल्यानंतर शनिवारी जायचं ठरलं. नकाशा किंवा जीपीएस च्या माध्यमातून रस्ते शोधत जाण्याचा माझा जुनाच छंद आहे. रस्त्यावर चालणाऱ्या माणसांना थांबवून प...